Top Ad unit 728 × 90

Breaking News

random

अवार्ड वापसी गैंग च्या १७०० लोकांचे सुरेश चव्हाणके वर कार्रवाई साठी ७ मुख्यमंत्र्यांना पत्र।

28 ऑगस्टला सुदर्शन न्युज चैनल चा बिंदास कार्यक्रम 'नौकरशाही जिहाद' या 'बिंदास बोल' वर हजार पानांचा स्टे ऑर्डर आणला गेला. आता देशाची राष्ट्रशक्ती जागी होऊन कार्यक्रमाचे मागणी करते आहे. तर देवशक्ती इतकीच दानवशक्ती देखील प्रबळ होऊन कार्यरत असते याची प्रचिती आली आहे. कारण प्रत्येक वेळा देशद्रोह्याला समर्थन करणारी अवार्ड वापसी गॅंग जी आतंकवादी अफझल गुरूची फाशी थांबवण्यासाठी मध्यरात्री हायकोर्ट उघडणारी पावरफूल गॅंग आहे. ही सेवानिवृत्त नोकरशाही गॅंग 'नोकरशाही जिहाद' हा कार्यक्रम होऊ नये यासाठी सक्रिय झाले असून. सुदर्शन न्युज चैनल चे प्रधान संपादक आणि या 'बिंदास बोल' कार्यक्रमाचे सर्वेसर्वा सुरेशजी चव्हाणके यांना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करू नये, अशी मागणी होते आहे. तर हीच ती 158-IAS /IPS सेवानिवृत्त लोकांची गॅंग आहे. याच माजी आय.ए.एस /आय.पी.एस अधिकाऱ्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना व ७ मुख्यमंत्र्यांना १७०० लोकांनी पत्र लिहून सुरेश चव्हाणके यांच्यावर कार्रवाई करावी,तर कार्यक्रम थांबविण्याची मागणी केली आहे. त्यात प्रामुख्याने राहुल चिल्लर IAS, सलीम अली IPS, शिवशंकर मेनन IFS, नजीब जंग IAS, एस.वाय कुरेशी IAS, अनिता अग्निहोत्री IAS, सिराज हुसेन IAS, अरुणा रॉय IAS, आफताब सेठ IFS, अशोक वाजपाई IAS, रमणी व्यंकटेश IFS, परविन तल्हा IRS, जोहर सिरकार IAS, सुजाता सिंह IFS, रश्मी शुक्ला शर्मा IAS, नवरेखा शर्मा IFS, एनसी सक्सेना IAS, श्याम शरण IFS, आलोक परती IAS, सुरेश के गोयल IFS, के. पी. केबियन IFS, एम. जी. देवश्याम IAS शिवाय विक्रमादित्य मोटवाने, मीनल बघेल, दीपल त्रिवेदी, कबीर खान , परजोय गुहा ठाकूरता, प्रिया रमानी, आकर पटेल, प्रिया चक्रवर्ती, विराज पटनायक, अविनाश कुमार, नताशा बधवार, सागरिका घोष, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप असे काही दीड शहाणे टीव्ही पत्रकार देखील सक्रिय झाले असून स्वतः पत्रकार असताना एका मीडिया हाऊसच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि 20 वर्षांपासून निरंतर पत्रकारिता करणाऱ्या जबाबदार पत्रकाराचा व्यक्तिमत्व आणि अभिव्यक्तीवर घाला घालण्याची भाषा कशी करू शकतात. असा प्रश्न सुज्ञ राष्ट्रभक्त प्रेक्षकांना पडला आहे. पण जेव्हा केव्हा विहीर खणली जाते तेव्हा मातीचा एक मोठा ढीग तयार होतो. उंच उंच चढायला... अशीच काहीशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. कारण 'नोकरशाही जिहाद'चा 'बिंदास बोल' कार्यक्रम थांबविण्याचा खोल खड्डा जिहादी शक्तीने सुदर्शन साठी खणला असला, तरी या कार्यक्रमाची मागणी वाढते आहे. आणि 28 ऑगस्ट पासून आमचे सगळे एपिसोड जनता उत्सुकतेने बघत असून. राष्ट्रभक्त देशवासी 'नोकरशाही जिहाद' हा 'बिंदास बोल' कार्यक्रम उंच उंच शिखरावर नेणार असे चित्र दिसते आहे.

from Sudarshan News https://ift.tt/3jIPL09
अवार्ड वापसी गैंग च्या १७०० लोकांचे सुरेश चव्हाणके वर कार्रवाई साठी ७ मुख्यमंत्र्यांना पत्र। Reviewed by Ranjit Updates on September 04, 2020 Rating: 5

No comments:

Please don't tag any Spam link in comment box

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.

Enter your email address:

Delivered by FeedBurner